दिनांक:15/11/2024
निलंगा : 'निलंगेकर' हा केवळ
एखादा व्यक्ती किंवा एखाद्याचे आडनाव नसून तो एक विचार स्वाभिमान आणि वा मतदारसंघातील तमाम जनतेची अस्मिता अस्मिता असून याला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाच इथली जनता संपवेल, असा खणखणीत इशारा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी गुरुवारी मतदारसंघात झालेल्या विविध प्रचार सभांमधून बोलताना दिला आहे. या मतदारसंघातील जनतेला आपल्या कामाचा आणि हक्काचा माणूस हवा आहे की 'गढी'वर देशमुखांचे पाय चेपणारा बाभळगावचा घरगडी पाहिजे, असा सवाल उपस्थित करीत संभाजीरावांनी
माजी मंत्री अमित देशमुख यांनाच घेरले आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील प्रचार लढतीत चांगलाच ट्विस्ट निर्माण झाला असून येथे निलंगेकर विरुद्ध देशमुख अशीच लढाई होताना दिसत आहे. त्यातही आता पाटील यांनी 'निलंगेकर' हे केवळ आडनाव किंवा व्यक्ती नसून आमचा स्वाभिमान असल्याचे सांगत भलतीच रंगत आणली आहे.
लातूर जिल्ह्याचा मी पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह लातूर शहराचाही मोठ्या प्रमाणात विकास केला. अगदी बाभळगाव आतले रस्ते सुद्धा आपणच केल्याचा दावा करीत
माझ्यानंतर पालकमंत्री झालेल्या अमित देशमुख यांनी कोरोना काळात निलंगा तालुक्याला ऑक्सीजन व औषधीही मिळू दिली नाही, असा आरोप संभाजी पाटील यांनी केला. कोविड काळात या ठिकाणची जनता तडफडत असताना बीड, जालना येथून औषधी व केंद्रीय मंत्यांना संपर्क साधत येथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत थेट बेल्लारीहून ऑक्सीजन मागविले. त्याच्या पावत्यासुद्धा माझ्याकडे आहेत, असेही ते म्हणाले. गेल्या वीस वर्षांमध्ये राजकीय पटलावर काम करताना कधीच गुंडागर्दी केली नाही, कोणाला धमकावले नाही, चुकीचे काम केले नाही, कधीच
गैरधंदे केले नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांचा आरोप खोडत त्यांच्यावरच पलाटवार केलाय.
दरम्यान, कुठल्याही भूलथापांना किंवा बनवेगिरीला बळी न पडता सुजान जनतेने राष्ट्र आणि आपल्या भागाच्या विकासासाठी त्सेच सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या जनहिताच्या योजना पुन्हा सुरू ठेवण्यासाठी मला निवडून देवून महायुतीचे हात् बळकट करा, असेही ते म्हणाले.
0 Comments