Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम महायुतीचे षड्यंत्र हाणून महायुतीच्या उमेदवाराला पाडा..मा.सहकार महर्षी.दिलीपराव देशमुख...

दिनांक:16/11/2024
 लातूर : (प्रतिनिधी):;राज्यातील महायुती सरकार
हे घटनाबाह्य सरकार असून या सरकारने सर्व समाजाला फसवले आहे. कुठल्याच समाज घटकांना न्याय दिलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. धीरज देशमुख यांना अधिक मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. सहकार क्षेत्र जपण्याचे काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने झालेले आहे, मात्र
हे सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा त्यांचा डाव आखत असून त्यापासून आपण वेळीच सावध राहिले पाहिजे, असे सांगून विकास कामासाठी आम्ही कटिबध्द आहोत पुढेही राहू असा शब्दही देशमुख यांनी मुरूड अकोला, चिंचोली, गाधवड, शिराळा येथील संवाद बैठकांत बोलताना दिला. यावेळी वैजनाथ शिंदे, आवासाहेब पाटील, धनंजय देशमुख, अशोकराव काळे, जगदीश बावणे, दयानंद बिडवे, विजयमूर्ती शेटे, अनिल पाटील, बाळासाहेव बिडवे,शेळके, हरिराम कुलकर्णी, भीमाशंकर शेटे, सत्तार पटेल, अरुणदादा कुलकर्णी, मदन भिसे, बंकट उपस्थित होते. कदम यांच्यासह मान्यवर
आम्हाला काँग्रेसला या भागातून १९८० पासून आपण आशिर्वाद दिलेले आहेत. तुमचे आमचे वेगळे नाते राहिलेले आहे. या भागात रस्ते, सिंचन, शेतकऱ्यासाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्‌या सक्षम करण्याचे काम जिल्हा बँक, मांजरा साखर परिवारातील साखर कारखान्यांनी केले आहे. पुढेही आपण करणार आहोत. या भागातील सर्व कामे करण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला असून काही कामे राहिलेली असतील ते आपण करण्यासाठीं कटिबध्द आहोत, असे सांगून कोणी तरी येईल भूलथापा देईल यापासून आपण सावध राहिले पाहिजे, असेही दिलीपराव देशमुख म्हणाले.

Post a Comment

0 Comments