दिनांक:16/11/2024
लातूर : महात्मा बसवेश्वर हे सर्वधर्मियांचे अद्धास्थान आहेत. महामार्गाच्या कामात बसवेश्वरांचा पुतळ्ळा येत असताना त्यावर राजकारण झाले पण भाजप राजकारण पण भाजप पुतळ्य हलला नाही. त्यामुळे या पुतळ्याशेजारी होणारी ही सभा ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले. गुरुवारी सायंकाळी महात्मा बसवेश्वर चौकात झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड. व्यंकट बेद्रे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, मरो मंत्री
शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, डॉ. भातांबे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, बाबू खंदाडे, बाबासाहेब कोरे, खंदा बाबासाहेबनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त
करताना डॉ. पाटील म्हणाल्या की, महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात येत होता. त्यावेळी त्यावरून राजकारण करण्यात आले. सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलवू नये. राष्ट्रीय महामार्ग त्याच्या बाजूने जावा यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक नितीन करी यांची भेटघेतली. ती विनंती मान्य झाली. यामुळे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलला नाही. त्याच चौकात आज ही सभा होत आहे. त्यामुळे ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणी महायुतीच्या सोबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता येणारच आहे. लातुरात विरोधक अपप्रचार करत आहेत. त्यांच्याकडे कर्तृत्व नाही. पदयात्रेत पूर्वजांचे फोटो घेऊन ते फिरत आहेत परंतु आता त्याचा फायदा होणार नाही. भाजपाने आपल्या वचननाम्यात लाडक्या बहिणींसाठी दिला जाणारा निधी १५०० रुपयावरून २१०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून बहिणींच्या खात्यात अधिक रक्कम जमा होणार असल्याचेही डॉ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या. यावेळी सचिन दाने, अजित पाटील कव्हेकर, प्रशांत पाटील यांनीही विचार मांडत डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेस शहर मतदारसंघातील भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत मार्गदर्शन करताना माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, ही निवडणूक आता जनतेनेच हातात घेतली आहे. भाजपा देशाचा आणि राज्याचा सर्वंकष विकास करू शकते हे जनतेच्या लक्षात आले आहे. राज्यातील महायुती सरकारने जनहिताच्या असंख्य योजना राबवल्या आहेत. त्यामुळे सरकार पुन्हा येणारच आहे. लातूर शहर मतदारसंघात 'देव' आणि 'घर'ही डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सोबत आहे, असेही कव्हेकर म्हणाले.
0 Comments