लातूर (प्रतिनिधी ): भाजपा नेहमीच सबका साथ,
सबका विश्वास, सबका प्रयास व सबका विकास या चतुःसुत्रीवर समाजकारण करत आहे. त्याच धर्तीवर लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी १०० टक्के योगदान देवून मतदारसंघाचा शाश्वत विकास हाच माझा ध्यास असल्याची ग्वाही लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी दिली. विधानसभा निवडणूक प्रचारानिमित्त डॉ. पाटील यांनी शुक्रवारी (दि.८) सिरसी व कातपूर या गावात पदयात्रा काढून गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. या पदयात्रेत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, शिवसिंह सिसोदिया,
शिवसेना शहरप्रमुख दिनेश बोरा, शिवसेना समन्वयक दीपक बडगिरे, लालासाहेब देशमुख, पृथ्वीसिंह बायस यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिरसी व कातपूर येथील मंदिरात दर्शन व आशीर्वाद घेत सुरु झालेल्या पदयात्रेत गावातील युवक-युवती, महिलांसह गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ठिकठिकाणी महिलांनी डॉ. अर्चनाताई पाटील यांचे औक्षण केले. गावकऱ्यांनी महायुती सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांबाबत समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी डॉ. चाकूरकर यांची भेट घेऊन या योजनेमुळे
संसार चालविण्यास हातभार लागला असल्याचे सांगितले. भाजपा महायुतीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभ्या असल्याचेही महिला म्हणाल्या. यावेळी बुथ प्रमुख भास्कर लोखंडे, नितीन देशमुख, मेघराज देशमुख, अविनाश आयतनबोने, सचिन देशमुख, सूर्यकांत वाघमारे, अमोल देशमुख, अमोल लंजारे, माणिकराव आलुरे, सुनिल होनराव, मंडलाध्यक्ष गोपाळ वांगे, बुथप्रमुख अमर पाटील, दत्ता गंभीरे, योगेश गंभीरे, अभिषेक गंभीरे, अभिजीत गंभीरे, माणिकराव आलुरे आदीसह सिरसी व कातपूर येथील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते.
0 Comments