Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

महायुती चे उमेदवार आमदार रमेश अप्पा कराड यांना धनगर समाज संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा**समाजाच्या हितासाठी महायुतीच्या पाठीशी मजबुतीने उभे रहा - खा विकास महात्मे*

दिनांक:10/11/2024
        लातूर (प्रतिनिधी):लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आ रमेशआप्पा कराड यांना धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून समाजाच्या हितासाठी आणि उन्नतीसाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आप्पांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलावा असे आव्हान पद्मश्री खा डॉ विकास महात्मे यांनी केले.
        लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजातील प्रमुख बांधवांची बैठक लातूर येथे रविवारी धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक पद्मश्री खा डॉ विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी माजी राज्यमंत्री रामराव वडकुते, महायुतीचे उमेदवार आ रमेशआप्पा कराड, संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अनंत बनसोडे, भाजपाचे नेते राजेश कराड, धनगर समाज नेते अनिल गोयकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, उद्योग आघाडीचे रामलिंग मदने, संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल पुजारी, भाजपाचे विजय काळे, दत्ता सरवदे, ओबीसी महिला आघाडीच्या हेमा येळे, सुमित्रा चिगुरे, अनिता कुसनुरे, लता घायाळ, हरीभाऊ काळे, अभिमन्यू माने, विष्णू पाटील, विठ्ठल कस्पटे, नानासाहेब कसपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        यावेळी बोलताना खा विकास महात्मे म्हणाले की, काँग्रेस आघाडीने धनगर समाज हितासाठी आजपर्यंत काहीही केले नाही उद्धव ठाकरे यांच्या सरकारने तर आरक्षणासह कुठल्याही प्रश्नावर बैठक सोडा एक शब्द कधी काढला नाही. देवेंद्रजी फडणीस यांच्या नेतृत्वातील महाविकास शासनाने आदिवासींना ज्या सोयी सवलती मिळत होत्या त्या धनगर समाजांना दिल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचा शासन निर्णय केला. सोलापूरच्या विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव दिले. देशात पहिल्यांदाच अहिल्यानगर नाव जिल्ह्याला दिले. याबाबतीतही शरद पवार यांनी भेटलेल्या मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांना आमचे सरकार आल्यास याबाबतीत पुनर्विचार करू असा शब्द दिला तेव्हा अहिल्यानगर हवे की पुन्हा अहमदनगर याचा समाज बांधवांनी विचार करावा. 
         संभाजीनगरचा संघर्ष किती वर्षापासून होता याचा विचार करून देवेंद्रजींनी आपल्याला सहजतेने मानसन्मान दिला याची जाणीव ठेवून विचारांनी मतदारांना प्रवर्त करावे असे सांगून खा विकास महात्मे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत समाजाने संघटितपणे काम करून महायुतीचे उमेदवार आमदार रमेश आप्पा कराड यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे या विषयात सर्वांचा सहभाग मोठा असावा असे बोलून दाखवले. 
      महायुती शासनाने राज्यातील प्रत्येक समाजासाठी महामंडळ स्थापन करून त्या त्या समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्याचे काम केले आहे जेवढे भाजपने दिले तेवढे आज पर्यंत कोणीच दिले नाही असे सांगून यावेळी बोलताना माझी मंत्री रामराव वडकुते म्हणाले की, कारखाने काढणारे तर खूप आहेत. शिका आणि संघटित व्हा बाबासाहेबांच्या या संदेशानुसार कराड परिवाराने दूरदृष्टी ठेवून ठीक ठिकाणी शैक्षणिक संकुले उभे केली राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या विकासाचा नेता आ रमेशआप्पा कराड यांच्या पाठीशी समाज बांधवांनी खंबीरपणे उभे राहावे
       आमदारकीच्या माध्यमातून मतदार संघात केलेल्या विविध विकास कामाची माहिती देऊन यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार आ रमेशआप्पा कराड यांनी संपूर्ण मतदारसंघात परिवर्तनाचे वारे आहे आपल्यासाठी आपल्या न्याय हक्कासाठी आणि विकासासाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची असून मस्तवाल काँग्रेसवाले पैशाच्या जोरावर निवडणुक जिंकण्याचे प्रयत्न करीत असले तरी यावेळी मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत तेव्हा आपण सर्वांनी या परिवर्तनाच्या लढाईत महायुतीला विजयी करून योगदान द्यावे असे आव्हान केले.
       यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष आनंद बनसोडे, भाजपा नेते राजेश कराड, धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे अनिल गोयकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पुजारी यांनी केले तर शेवटी विष्णू पाटील यांनी उपस्थित आमचे आभार मानले या प्रसंगीत धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments