उदगीर प्रतिनिधी: उदगीर मतदार संघाचा आमदार म्हणून काम करताना गेल्या पाच वर्षांमध्ये मतदार संघाच्या विकासासाठी काम केले आहे मतदारसंघातील गावागावात रस्ते पाणी वीज गटारी आरोग्यसेवा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिले आहेत गेली पाच वर्ष जनतेची जनसेवक म्हणून कार्य केले आहे असे प्रतिपादन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते.
कौडखेड येथील शिवम फंक्शन हॉल येथे शुक्रवारी माहितीच्या विजय संकल्प मेळावा पार पाडला .यावेळी मंचावर पक्षनिरीक्षक हरीश कोटवाले, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश नीटुरे, व्यंकट बेंद्रे, भगवान पाटील, तळेगावकर ,एडवोकेट गुलाबराव पाटील, राहुल केंद्रे, धरमपाल नादरगे, रामचंद्र तिरुके, सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, समीर शेख, रामराव राठोड, भरत कांबळे, गोपाळ माने, देवीदास काळे, उत्तरा कलबुर्गे ,दिपाली आवटे, अमोल निळवदे अर्जुन आगलावे, ब्रह्माजी केंद्रे, श्याम ढवळे ,प्रवीण भोळे, शिवशंकर धुपे ,मनोज पुदाले, प्रभावती कांबळे, साईनाथ चिमेगावे, बालाजी भोसले ,वसंत पाटील, सय्यद जानिमिया, विजय निटुरे, उदय मुंडकर ,आदी उपस्थित होते.मतदार संघातील जळकोट तालुक्याची दुष्काळी डोंगरी तालुका म्हणून अनेक वर्षापासून ओळख होती या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आरती उन्नती व्हावी म्हणून तिरू नदीवर कोट्यावधी रुपये खर्च करून सात बॅरेज ची निर्मिती केली आहे या बॅरेजमुळे जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती होऊन पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहेत मराठवाड्यातील एकमेव वाटर योजना ही केवळ आपल्या मतदारसंघातून मंजूर करून घेतली पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
0 Comments