वलांडी प्रतिनिधी: निलंगा विधानसभा मतदारसंघातील वलांडी येथील बुथ प्रमुखाच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, संगायो आयोग समिती अध्यक्ष शेषराव ममाळे, निलंगा बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे, औराद बाजार समितीचे सभापती नर्सिंग बिरादार, माजी सभापती संजय दोरवे ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, दगडू साळुंखे, तालुकाध्यक्ष काशिनाथ गरिबे, आदी उपस्थित होते. आमदार निलंगेकर म्हणाले महायुतीच्या सरकारने अनेक लोक उपयोगी निर्णय घेतले असून शेतीपंपाची, वीज बिल एक रुपयात पिक विमा अतिवृष्टीचे अनुदान ,मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना, सोयाबीन अनुदान ,पोलीस पाटील मानधन, वाढ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या रोजगार, सेविकांचे मानधन, अशा वर्कर, मानधन असे प्रत्येक समाजातील लोक उपयोगी निर्णय या महायुती सरकारने घेतले आहेत. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना सभागृह सृष्टी, गटार नाल्या हे विकास कामे होतच राहणार परंतु गावातील उंबरठ्याला कशी मदत करता येईल हेच धोरण युती सरकारच्या काळात राहिले आहे ,मागील अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळातील व अडीच वर्षाच्या महायुतीच्या सत्तेच्या काळातील विकास कामाच्या निधीचा तुलना करा काळातील विकास कामाच्या निधीची तुलना करा काँग्रेसवाल्यांनी अडीच वर्षात काय केले याचे उत्तर द्यावे व आम्ही मतदारसंघात किती निधी आणला आहे पण दाखवावे असे आव्हान माजी मंत्री अमित देशमुख यांचे नाव घेऊन दिले.
काँग्रेस हे फक्त जातीवादी चे राजकारण केली.
युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले दहा वर्षांपूर्वी देवणी तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरुस्त झाली होती त्या रस्त्याचा अनुरूप आपण भरून काढला असून मतदारसंघातील मोठ्या रस्त्याबरोबरच गावांतर्गत रस्ते सुद्धा चांगले केले आहे विरोधकाकडे दिशादृष्टी काहीच नाही केवळ आरोप करणे एकमेव कारण आहे केंद्रातील आणि राज्यातील सरकारने शेतकरी शेतमजूर ना केंद्रबिंदू ठरवून योजना आखल्या आहेत.
प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments