Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.अर्चना पाटील यांना विजयासाठी केंद्रीय मंत्री गडकरींकडून शुभेच्छा

दिनांक:13/11/2024
लातूर (प्रतिनिधी):केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विजयासाठी शुभेच्छा व आशीवांद दिले. सुखी व समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी डॉ. अर्चनाताई पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन लातुरातील मतदारांना केले. देवणी येथील सभेला जाण्यासाठी नितीन गडकरी लातूर विमानतळावर आले होते. लातूर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी त्यांची यावेळी भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी ताईंना आशीवांद देत मतदारसंघातील प्रचार मोहिमे संदर्भात माहिती जाणून घेतली. उर्वरित कालावधीत प्रचाराची दिशा कशी असावी ? या संदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले. माध्यमांशी संवाद साधताना नितीन गडकरी म्हणाले की, सुखी व समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी महायुतीचे सरकार काम करत आहे. निवडणुकीनंतरही पुन्हा महायुतीचे सरकार येणार असून राज्यातील गावांचा विकास, गरीब व शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी हे सरकार नव्या जोमाने कामाला लागणार आहे. महायुती सरकारला बळ देण्यासाठी लातूरच्या प्रतिनिधी म्हणून डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करत सेवा करण्याची संधी त्यांना द्या, असेही गडकरी म्हणाले. यावेळी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, स्थायी समितीचे माजी सभापती अॅड. दीपक मठपती, शैलेश गोजमगुंडे, अजित पाटील कव्हेकर यांच्यासह भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 *डॉ. अर्चना पाटलांचा विद्यार्थ्यांशी संवाद लातूर: लातूरचा सर्वांगीण विकास व्हायचा* 

असेल तर इथे नोकऱ्यांची संधी उपलब्ध असणे गरजेचे आहे. येथील ज्ञानाचा उपयोग लातूरकरांना झाला पाहिजे. या नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी आयटी क्षेत्रातील कंपन्या लातूरला येणे आवश्यक असून त्यासाठी १०० टक्के योगदान देणार असल्याचे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी सांदिपनी टेक्निकल कॅम्पस व एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित विद्याथ्यर्थी संवाद बैठकीत केले. यावेळी भाजप युवा नेते ऋषीकेश कराड, युवामोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, हैबतपूरकर महाराज, प्राचार्या कुलकर्णी यांची उपस्थिती होती. लातूरने शैक्षणिकक पॅटर्न निर्माण केला परंतू नोकऱ्यांच्या संधी येथे उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने लातूर मागे राहिले. त्यामुळे येथील युवक मुंबई, पुणे, बेंगलोर आदी ठिकाण नोकरीसाठी जातात. यापुढे असे होणार नाही लातुरात जसा शैक्षणिक पॅटर्न निर्माण झाल् तसेच नोकऱ्यांसाठी लातूरमध्ये संधी उपलब् करुन देण्याचे काम आम्ही पुर्ण शक्तीने कर असे डॉ. चाकूरकर म्हणाल्या. ऋषीकेश करा यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे वर्षांपासून नेतृत्व करणाऱ्यांनी मतदारसंघासा केले तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला.

Post a Comment

0 Comments