दिनांक:11/11/2024
लातूर (प्रतिनिधी): लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके, लातूर ग्रामीणचे डॉ. विजय अजनीकर, निलंगा येथून मंजुषा
निंबाळकर, उदगीरमधून प्रा. शिवाजीराव बेवनाळे, औसा येथील कुमार शिवाजी यांच्याप्रचारार्थ लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे रविवारी सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. पुढे
बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी हे जनतेला फसवत आहेत. मागच्या वेळी संविधान व लोकशाहीचा सार्वत्रिक इश्यू केला. संविधानातील
समतेचा मार्ग आरक्षणाच्या माध्यमातून जातो. तो मार्गच संपवला जातोय. हे सगळं थांबवण्यासाठी वंचितचे उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. मुस्लिम बांधवावर मागील पाच वर्षात एनआरसी, औरंगजेब,
टिपू सुलतान व मशिदीच्या स्टेट्स वरून मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. आम्ही औरंजेबच्या मनारवर चादर चढवली आणि हल्ले बंद झाले. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी उभी राहिली. आता नि मुस्लिमांनी वचितच्या उमेदवारांच्या मागे उभे राहिले पाहिजे, उद्याच्या पिढीचे अधिकार, मान सन्मान, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन अॅड. आंबेडकर यांनी केले. यावेळी वचितचे जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, रमेश गायकवाड, संतोष सूर्यवंशी, संतोष सोमवंशी, सचिन लामतुरे, सचिन गायकवाड, सुजाता अजनीकर *आदींसह नागरिक, महिला, युवक उपस्थित होते.*
0 Comments