दिनांक:10/11/2024
निलंगा (प्रतिनिधी): संभाजी पाटील यांच्या जन- आशीर्वाद यात्रेला मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून निवडणुकीची ही लढाई महायुतीतील तमाम कार्यकर्त्यांनीच स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. दादासाहेब अर्थात डॉ. शिवाजीराव
पाटील निलंगेकर यांनी विकासाच्या बाबतीत पाहिलेली सर्व स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न आपण करीत असून विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे काही कामे नव्याने करावी लागतात आणि ते करण्यासाठी मी बांधील आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. यापुढेही चौफेर विकासासाठी मी आहोरात्र झटेल, असा विश्वास देत खरे तर निलंग्यामध्ये विकासाच्या आणि कामांच्या मुद्द्यांवर निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी बाभळगावच्या देशमुखांनी तमाम निलंगेकरांच्या स्वाभिमानालाच धक्का देत जनतेच्या हातापायाशी राबणारा उमेदवार देण्याऐवजी त्यांचेच पाय धरून राहणारा उमेदवार देत इथल्या जनतेचा एक प्रकारे
अवमानच केल्याची टीका आ. निलंगेकर करीत आहेत.
संभाजी काल जसा होता तसाच आज आहे आणि उद्याही तसाच राहणार आहे. जेव्हापासून निलंग्याच्या राजकारणातून समाजकारण करीत आहे तेव्हापासून निलंग्याच्या जनतेच्या स्वाभिमानाला कुठेच धक्का पोहोचू दिला नाही. यापुढेही इथल्या माणसाला मान खाली घालावी लागेल असे कधीच वागणार नाही, असे अभिवचन देत संभाजीरावांनी दिलेल्या हाकेला जनता जोरदार प्रतिसाद देताना दिसत आहे. या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल आणि पिळवणूक लक्षात घेऊन गेल्या एक तपापासून बंद असलेला साखर कारखाना सुरू करून ११ महिन्यातच ऊस गाळप करीत उसाला पहिली उचल सत्तावीसशे रुपये देण्याचा उच्चांक अंबुलगा कारखान्याच्या माध्यमातून मराठवाड्यात केला. यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांचा ऊस सतरा ते आठरा महिने नेला जात नव्हता, नेलाच तर भाव मिळत नव्हता. अशा स्थितीत अंबुलगा कारखाना पुन्हा सुरू करून या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक घडी बसविण्याचा पाया रोवला असल्याचेही संभाजीराव
सांगतात.
0 Comments