Ad Code


Ticker

6/recent/ticker-posts

लातूरला स्वताची जहागीर समजणारया ना पाडा.... केंद्रीय मंत्री पियूष गोयल

दिनांक:14/11/2024
लातूर (प्रतिनिधी): महाविकास आघाडी महाराष्ट्राला विनाशाकडे नेण्याचे काम करत आहे की महाविकास नव्हे तर महाविनाश आघाडी आहे. लातूर मतदार संघात अभिनेतांना आणून जनतेचे मनोज केले जात आहे.खोटी आश्वासने देत दिशाभूल करून भाषणातून माती भडकवण्याचे काम सुरू आहे समाजासमजात जाती-जातील भांडे लावण्याचे काम केले जात आहे जे काम आपल्याला करता आले नाही त्याचे खापर इतरांच्या माथ्यावर पडण्याचे काम सुरू असल्याचे पियुष गोयल यांनी सांगितले. 
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकारी येणार असल्याचे अंदाज विविध सर्वेक्षणातून व्यक्त केले आहे लातूर मतदार संघात महायुतीने एक उच्चशिक्षित व कर्तृत्व आणि महिला उमेदवार दिला आहे लातूरच्या विकासाचा आवाज बुलंद करण्यासाठी या उमेदवाराच्या पाठीशी रहा त्यासाठी उर्वरित सहा दिवस महायुतीला द्या मात्र मतदारसंघातील 80 टक्के मतदान करून घ्या आणि अमित देशमुख व धिरज देशमुख यांना पराभूत करून जनतेचा विश्वास करणाऱ्याला धडा शिकवा असे आव्हाने गोयल यांनी केले. 
लातूर कडे आठ वर्ष राज्याचे नेतृत्व होते त्याच मुख्यमंत्र्याची दोन्ही मुली आमदार आहेत तरीही लातूरचा विकास झाला नाही व्यापार उद्योजकच्या समस्या कायमच राहिल्या त्यांच्या निरा करण्यासाठी आमदारांनी काम केले नाही रेल्वे सारख्या महत्त्वाच्या प्रश्नावली मंत्र्यांना भेटण्यास आमदाराचा वेळ मिळाला नाही मुख्यमंत्री असताना देशमुख यांनी मराठवाड्यासाठी एक तरी मोठा प्रकल्प आणला का असे सवाल परत भाजपाचे नेते माझ्याकडेच आल्यामुळेच रेल्वे बुकिंग मंजूर केला आपण यावेळी डॉक्टर चाकूरकर यांना निवडून द्या त्या मुंबई व दिल्लीतून आपल्यासाठी प्रकल्प खेचून आणतील असे पियूष गोयल म्हणाले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी लातूर हे मराठवाड्यातील एक मोठे व्यापार व उद्योग केंद्र आहे असे सांगत रेल्वे कोच फॅक्टरी लातूर साठी दिल्याबद्दल पियुष गोयल यांचे आभार मानले या प्रकल्पात अजून उत्पादन सुरू झाले नसून ते लवकर सुरू व्हावे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे 250 सह प्रकल्प लातूर एमआयडीसीत हवेत अशी मागणी केली, यातून येथील तरुणांना उद्योग भारतात येईल लातूरच्या अर्थव्यवस्था गतिमान होईल असे अर्चनाताई पाटील म्हणाल्या लातूर मधून मोठ्या प्रमाणात जीएसटी आयकर भरला जातो, परंतु त्यांच्याशी संबंधित कार्यालय नांदेड येथे आहे ते लातूर येथे हलवावे लातूर येथे मोठा उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत आदी मागण्या केल्या.
रामदास भोसले यांनी या मेळाव्याचे प्रस्तावित केले. या मेळाव्यास जितेश चापसी, दिनेश गिल्डा ,मुस्तफा शेख, विशाल अग्रवाल, भारत माळवदकर, फय्याज पटेल व शैलेश गोजमुंडे एडवोकेट दिविजय काथवटे व शहरातील उद्योजक व्यापारी, सीए, आणि विविध समाज घटकातील मान्यवर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments