भोकर( तालुका प्रतिनिधी)समाजात सर्वकाही मिळते परंतु सत्संग हा भाग्यानेच मिळतो श्रीमंती व पैशाने सत्संग मिळत नाही सत्याची आस लागावी लागते खरा सत्संग जीवनात आला की भक्तीचा रंग चढतो असे अध्यात्मिक विचार आचार्य प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्य स्वामी महाराज यांनी भोकर येथील शिव महापुराण कथेत बोलताना मांडले.
भोकर येथे श्री संत नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठाव कलशारोहण सोहळ्या सोहळ्यानिमित्त 17 ते 24 ऑक्टोबर दरम्यान शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर प्रथम दिवशीच्या कथेत बोलताना स्वामी गजेंद्रजी चैतन्य महाराज म्हणाले श्री संत नामदेव महाराज चरित्र आणि शिव महापुराण कथा अशी सांगड या कथेत घातली असून कथा हृदय मंदिरात बसविली पाहिजे,रावणासारखा भक्त कोणी नव्हता रावणासारखा विद्वान कोणी नव्हता मात्र रावणाकडे सत्संग नव्हता म्हणून त्याचा नाश झाला,जीवनात सत्संग आला की आनंद मिळतो ,संपत्ती,सत्ता,विद्वत्ता टिकवणे ही अवघड बाब आहे जीवनात नम्रता असावी लागते,श्रीमंत असणारा भाग्यवान असतो असे नाही भाग्यवान तो आहे जो संतचरण याच्या आश्रय घेतो परमतत्वाशी एकरूप होतो जीवनाचे कल्याण करणारी शिवमहापुराण कथा आहे मनाच्या एकाग्रतेसाठी सत्संग आवश्यक आहे शेवटपर्यंत जो साथ देतो त्याची साथ करायला शिका मनातील द्वेष पाप भावना सत्संगाने दूर होतात म्हणून सर्वांनी सत्संग जीवनात करावा जीवन धन्य करण्यासाठी संतांची संगती व ईश्वर भक्तीचा मार्ग धरावा असेही विचार स्वामीजींनी मांडले
0 Comments